Sunday 31 January 2016

मुखपृष्ठ


या अंकात



संपादकीय मंडळ

नरेंद्र खोत
प्रफुल्ल शशिकांत
प्रणाली सिसोदिया
शैलेश जाधव

इमेल : contact.knirman@gmail.com
वेबसाईट : www.mkf.org.in/mso
संपर्क: ९४२०६५०४८४, ९५०३०६०६९८

अंक सहावा | जानेवारी २०१६

हे मासिक खालील लिंक वर मूळ स्वरुपात वाचता येईल
http://kumarnirman.blogspot.in/

(खाजगी वितरणासाठी)

भेट वृत्तांत

कुमार निर्माण टीमने (प्रफुल्ल, प्रणाली व शैलेश) मराठवाडयातील गटांना भेटी दिल्या. सर्व गटांनी खूप छान प्रतिसाद दिला. मुलांसोबत खूप मज्जा आली.

डोमरी गट
सगळ्यात पहिली भेट आम्ही डोमरीतील ‘गुरुकुल’ येथील ‘जागृती’ गटाला भेट दिली. गुरुकुलाचा निसर्गरम्य परिसर हेच तेथील मुलांसाठी प्रेरणा आहे. गट निवासी शाळेत राहतो. मुले खूप स्मार्ट आहेत. खूप छान गट आहे. गटातील मुलांनी दिवाळीत बरेच कृतिकार्यक्रम केलेत. दुपारी गटातील सर्व मुले आम्हाला घेऊन शाळेच्या बाजूच्या डोंगरावर गेली. तिकडे पण आम्ही खूप मज्जा केली. थोड्याच दिवसात मुलांची पालकसभा असल्याने त्यासाठी मुले नाच, गाणी, नाटक यांच्या सरावात गुंग होती. आम्हालापण मुलांनी त्यांची नाटकं करून दाखवली.
गुरुकुलातील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे सर्व मुले तिथे शिक्षकांना भैय्या, काका, ताई असं म्हणतात. आम्हालाही सर्व मुले ताई-दादा म्हणून आवाज देत होती. सकाळ – संध्याकाळ मुले आमच्यासोबतच जेवायला बसत होती. मुले खूप लाघवी आहेत. दोन दिवसांत त्यांच्याशी छान attachment झाली.

आमची शाळा, खरपुडी

खरपुडीचा गटही निवासी शाळेत राहतो. त्यांचा परिसर खूप सुंदर आहे. गटात लहान-मोठी सगळीच मुले एकत्र छान काम करतात. गटातील मुलांनी सांडपाण्यावर खूप सुंदर बाग फुलावालीय. त्या बागेला त्यांनी Oxygen Park नाव दिलंय. गटातील मुलांसोबतच शाळेतील इतर मुले आणि शिक्षकही त्या बागेची खूप काळजी घेतात.
आम्ही शाळेतील मुलांसोबत छान खेळ घेतले, कोडी घातली, गाणं घेतलं. मुलांना खूप मज्जा आली. त्यानंतर गटातील मुलांसोबतही आम्ही memory game घेतला. मुलांनी त्याही खेळाचा खुप आनंद घेतला. आम्हालाही मुलांनी खूप प्रश्न विचारले. तिथे मुलांची एक नमुना बैठक आम्ही घेतली. मुलांनी खूप शांतपणे सगळं काही समजून घेतलं. मुलांसोबत एकूण छान मज्जा करून आम्ही गटाचा निरोप घेतला.
चौसाळा गट, बीड

चौसाळ्यातील गट हा शाळेतील विद्यार्थ्यांचा गट आहे. गट संख्येने लहान असला तरी गटात मुले-मुली दोघेही समप्रमाणात आहेत. शाळेचा परिसर खूप सुंदर आहे. मुले आमची वाट पाहत होती. आम्ही गेलो त्यादिवशी युवकदिन असल्याने गटातील मुलांनी आमचं छोटेखानी स्वागत केलं. मुले खूपच बोलकी आणि active आहेत. याआधी गटातील मुलांनी दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून वापरलेली आपट्याची पाने त्याच झाडाखाली खड्डा करून त्यात परत टाकली. एका मुलांनी घरी rain water harvesting करण्याचा प्रयत्न केला, गटातील काही मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली तसेच इतर वर्गांवर जाऊन बाकीच्या विद्यार्थ्यांनाही फटाक्यांचे दुष्परिणाम समजावले आणि फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. दिवाळीच्या फराळातील थोडंसं नाली साफ करणाऱ्या लोकांनाही दिलं. आणि याबरोबरच बरंच काही केलंय.
गटातील मुलांसोबतच इतरही काय चाललय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिथे मुलांसोबतच जेवलो, आणि मुलांनी आम्हाला थोडा खाऊपण दिला. मुलांसोबत खूप छान गप्पा झाल्या. काही मुलांनी आम्हाला भरारी अंकात दिलेले गाणेही म्हणून दाखवले. तिथेही एकूण खूप मज्जा आली.

माजलगाव - सिद्धेश्वर गट

साधारण दुपारच्या सुमारास आम्ही सिद्धेश्वर विद्यालयात पोचलो. लगेचच निलेश राठोड सर आम्हाला भेटले. आम्ही गेलो तर गटातील मुले आमची वाट पाहत एका रुममध्ये बसलेली होती. या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे या गटात जास्त प्रमाणात बहिण-भावंडे आहेत. त्यामुळे त्याचं छान जमतं. गटातील मुले खूपच बोलकी आणि चुणचुणीत आहेत. गेल्यानंतर गटाची व आमची एकमेकांशी ओळख व्हाही म्हणून आम्ही त्यांच्यासोबत memory game खेळलो. मुलांना तो खेळ खूप आवडला. त्यानंतर मुलांशी कुमार निर्माणशी संबंधित बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. इतरही गप्पा झाल्या. मग मुलांनी हसत खेळत कुमार निर्माण म्हणजे काय हे पुन्हा एकदा समजून घेतलं. हे समजून घेत असताना मुलांनी आम्हाला खूप वेगवेगळे प्रश्न विचारले, त्यावरून त्यांचा संवेदनशीलपणा दिसून आला. कुमार निर्माण समजून घेताना आम्ही मुलांना आपल्या शाळेतील समस्या काही जाणवतात का असे सांगून मुलांना शाळेचे निरीक्षण करायला पाठवले. निरीक्षण करून गटात परत आल्यानंतर असं जाणवलं की मुलांनी खूप विचार करून समस्यांची यादी केलेली आहे. यावर मुलांनी हळूहळू काम करण्याचे ठरवले आहे.
त्यानंतर आम्ही मुलांसोबत ‘इहा...’ नावाचा खेळ खेळलो. त्यातही मुलांना खूप मज्जा वाटत होती. एका मुलाने छान भक्ती गीत म्हणून दाखवले.
आम्ही गेलो त्यादिवशी सिद्धेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा सुरु होता. त्यात मुलांनी ‘खरी कमाई’ साठी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे ठेले लावलेले होते. त्यात मग मुलांनी आम्हाला बरंच काही चविष्ट खायला दिलं.  बऱ्याच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन आम्ही गटाला पुन्हा लवकरच भेटू असं सांगून मुलांचा निरोप घेतला.
मोहा गट
सकाळच्या सुमारास आम्ही मोह्याला पोचलो. जाताना अंबाजोगाई दर्शन करत आम्ही मोह्याला पोचलो.  मोह्याच्या गटात जवळपास ३२ मुले-मुली आहेत. त्यातही मुले-मुली समप्रमाणात आहे. गटात ५ वी पासून ते १० वी पर्यंतची मुले आहेत. त्यामुळे मोठी मुले लहानांची छान काळजी घेतात. याही गटातील मुलांसोबत आम्ही ओळख करून घेण्यासाठी गमतीदार memory game खेळलो. मुलांनी त्या खेळाचा खूप आनंद घेतला.
आम्ही गेलो होतो त्या दिवशी संक्रांत होती. मुलांनी सांगितलं की आज १२ भाज्या आणि तिळीच्या भाकरीचं जेवण असतं. ते मस्तपैकी खाऊन आम्ही परत गटासोबत बसलो. मग गटाशी कुमार निर्माण संबंधित बरीच चर्चा झाली. विशेष म्हणजे या गटातील काही मुलांना मागील वर्षी माजलगावला झालेल्या कार्यशाळेचा संपूर्ण तपशील आठवत होता. याच तपशिलावरून पुन्हा एकदा आम्ही गटाला कुमार निर्माण म्हणजे काय हे समजून सांगितले.
याआधी गटातील मुलांनी यात्रेत खराब झालेली टेकडी साफ केली होती. गटातील बऱ्याच मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली होती आणि त्यातून वाचलेल्या पैशातून त्यांनी काहीतरी उपयोगी वस्तू घेतली होती. आता मुलांनी शाळेचं सुशोभीकरण करण्याचे ठरवले आहे. एकूण मुलांचं खूप छान चालू आहे.

उमरी गट

दुपारी १ च्या सुमारास आम्ही उमरी गावात पोचलो. गाव बरंच मोठं होतं. गावात गेल्यावर थोडावेळ भारतकडे बसून आम्ही शाळेवर गेलो. इथल्याही मुलांचा गट शाळेतील आहे. उमरीला दोन गटात प्रत्येकी १५ जण असून फक्त मुलांचा गट आहे. या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे गटात १०वीची मुले जास्त प्रमाणात आहेत. एकाच गावात राहत असल्याने दोन्ही गटातील मुलांमध्ये खूपच चांगली ओळख आणि छान attachment होती. याही गटाची आम्ही मजेशीर memory game च्या मदतीने ओळख करून घेतली. मुलांनी छान आनंद घेतला.
यानंतर मुलांनी याआधी केलेल्या कृतिकार्यक्रमांचं sharing केलं. त्यात एक मुलगी शाळेसमोरील खड्ड्यात पडून तिचा हात मोडला होता तो खड्डा मुलांनी बुजवला तसंच शाळेसमोर एसटी बसचा थांबा असूनही तिथे एसटी बस थांबत नव्हती आणि यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या मुलांची खूप गैरसोय होत होती. यावर उपाय काढण्यासाठी गटातील मुलांनी एकत्र येऊन एक नवीन एसटी बस थांब्याची पाटी बनवून ती शाळेसमोर लावली, यामुळे आज तिथे एसटी बस थांबते. यासोबतच नवरात्रीच्या यात्रेत एका मंदिरावर जाण्यासाठीच्या पायऱ्यांवर पडलेले बारीक खडे गटातील काही मुलांनी जाऊन उचलले आणि काहींनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. हे सगळे कृतिकार्यक्रम सांगतांना मुलांना खूप आनंद होत होता.
यासोबतच पुन्हा एकदा गटातील सर्व मुलांनी कुमार निर्माण म्हणजे काय हे चर्चेच्या माध्यमातून समजून घेतले. या चर्चेनंतर मुलांनी एका कागदावर गावातील त्यांना सोडवता येणाऱ्या प्रश्नांची यादी बनवली आम्हाला वाचून दाखवली. यानंतर मुलांनी यादी केलेल्या प्रश्नांवर काम करण्याचे ठरवले आहे.
छान गप्पागोष्टीच्या स्वरुपात मुलांसोबत बोलून आम्ही गटाचा निरोप घेतला.

औरंगाबाद गट

अगदीच सकाळी ८च्या सुमारास आम्ही साताऱ्याच्या गटाला भेटलो. संक्रांतीचा दुसराच दिवस असल्याने शाळेतील मुले छान रंगीबेरंगी कपडे घालून आली होती. आम्ही गेल्यावर निमंत्रक तसेच गटातील मुलांनी आम्हाला तिळगूळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पटांगणावर मस्तपैकी उन्हात आम्ही गटासोबत गप्पा करायला बसलो. गटात मुलींचं प्रमाण जास्त आहे. गटातील मुलं खूपच active आहेत.
याआधी मुलांनी शाळेमागील टेकडीवर जाऊन प्लास्टिकच्या पिशव्या उचलल्या होत्या. गटातील बऱ्याच मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली तसेच फटाकेमुक्त दिवाळी संदर्भात भित्तीपत्रके बनवून ती शाळेच्या भिंतींवर लावली आणि इतर मुलांनाही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन दिले. नुकतंच संक्रांतीच्या निमित्ताने गटातील मुलांनी कागदी पिशव्या बनवून तेथील भाजीवाले तसेच मेडिकलवाल्यांना दिल्या. मुलांनी आम्हालाही आठवण म्हणून एक-एक पिशवी दिली. यापुढे गटाने शाळेजवळील अनाथालयाला भेट देण्याचे ठरवले आहे. गटासोबत कुमार निर्माण संबंधित चर्चा होत असताना मुलांनी बरेच प्रश्न विचारले. आम्ही घातलेल्या कोड्याचा बराच विचार करून गटातील एकीने त्या कोड्याचे उत्तरही दिले. आम्हालाही गटासोबत खूप मज्जा आली. मुलांसोबत ‘इहा...’ हा खेळ खेळून आणि बऱ्याच गप्पा करून आम्ही तिथून परतीच्या प्रवासाला निघालो.


एकूण सर्वच गटांसोबत खूप मज्जा आली. आम्हाला वाटलेली सर्वात छान गोष्ट म्हणजे आम्हाला “तुम्ही पुन्हा आमच्याकडे कधी येणार?, तुम्ही लवकर आमच्याकडे या, आम्हाला पुन्हा भेटायला नक्की या.” हे आम्हाला प्रत्येक गटाने हक्काने सांगून पुन्हा येण्याचे promise आम्हा तिघांकडून घेतले. आणि म्हणून तुम्हा सर्वांना promise केल्याप्रमाणे आपण सर्वजण लवकरच पुन्हा एकदा भेटू आणि अशीच मज्जा करू.

उल्लेखनीय कृती कार्यक्रम


जय ज्योती गट उमरी

कुमार निर्माणच्या उमरी गावातील गटातले मुले ज्या शाळेत जातात ती शाळा गावापासून थोडी अंतरावर आहे. परिसरात दुसरी मोठी शाळा नसल्याने आसपासच्या गावातील मुलेही या शाळेत येतात. शाळा लगेचच बाहेर गावातील मुलांना जाण्यासाठी सोयीची अशी एक बस आहे. पण शाळेजवळ बसथांब्याची पाटी नसल्याने बस तिथे थांबत नव्हती. मुले गावात जाईपर्यंत बस निघून गेलेली असायची. मग मुलांना ६:३० पर्यंत बसची वाट बघत थांबावे लागे किंवा मग पायपीट करत घर गाठावं लागे.
कुमार निर्माणच्या गटाच्या हे निदर्शनात आल्यावर त्यांनी बैठक बोलावली व बैठकीत चर्चा केली. बैठकीत असं कळालं की शाळेजवळ बसथांबा आहे पण बस थांब्याची पाटी नसल्याने येथे बस थांबत नाही. मग आपण ती पाटी बसवूया असं मुलांनी ठरवलं. पण मग पाटी बसवायची तर खर्च येणार तो खर्च कसा करायचा याच्यावरही बैठकीत चर्चा झाली. खर्चासाठी मुलांनी त्यांच्या त्यांच्यामध्ये वर्गणी केली. जमलेल्या पैश्यातून पाटी बनवून मुलांनी ती शाळेजवळ बसवली. आता नियमित पणे बस शाळेजवळ थांबते आणि बाहेर गावातील मुलांना घेऊन जाते.






जाणीव गट चौसाळा
जाणीव गटाचीबैठक सुरु असताना काय करता येयील या विषयी चर्चा सुरु होती. निमंत्रकांनी त्यांना तिसरीच्या वर्गात बोलावले होते. तेव्हा मुलांना दिसले की तिसरीच्या मुलांना अभ्यासक्रमात खवा-भट्टी विषयी माहिती दिलेली आहे. त्यांच्या गावातच खवा-भट्टी आहे. तेव्हा मुलांनी ठरवले की आपण तिसरीच्या मुलांना प्रत्यक्ष खवा-भट्टी बघायला नेवूया. त्यांनी निमंत्राकाना ही कल्पना सांगितल्यावर निमंत्राकानीही आनंदाने परवानगी दिली.
मग मात्र मुले कामाला लागली त्यांनी तिसरीतील मुलांची कसून तैयारी करून घेतली. जातानी कसं जायचं,


तिथे गेल्यावर काय काय बघायचं, काय प्रश्न विचारायचे, परत येतानी कसं यायचं. ही सगळी तैय्यारी जाणीव गटाच्या मुलांनी तिसरीच्या मुलांकडून करून घेतली. सगळी तैयारी झाल्यावर मग ठरल्या प्रमाणे जाणीव गटाची मुले तिसरीतील मुलांना शिस्तीत खवा-भट्टी बघायला घेऊन गेले. तिथे तिसरीच्या मुलांनी प्रश्न विचारले आणि शिस्तीमध्ये सगळी मुले भेट आटोपून परत शाळेत आली.
जाणीव गटातील मुलांनी तिसरीतील मुलांसोबत फोटो काढले. तिसरीतील मुलांची आणि जाणीव गटातील मुलांची आता छान दोस्ती झालीय. या मुलांनी आम्हाला खवा-भट्टी दाखवली मग आम्ही पण जमेल तेव्हा त्यांना मदत करू अशी तिसरीतील मुलांची प्रतिक्रिया होती.




जय क्रांती गट उमरी
कुमार निर्माण च्या उमरी गावातील जय ज्योती गटातील विकास, कृष्णा आणि बाकीचे मित्र टेकडीवर फिरायला गेले होते. नवरात्रीच्या दिवसात गावाच्या जवळील याच टेकडीवरील देवीच्या दर्शनाला गावातील स्त्रिया जातात. नवरात्र असल्याने जास्तीत जास्त बायकांच्या पायात चप्पल नसते. या मुलांना फिरताना असं दिसलं की अनवाणी असल्यानी स्त्रियांना पायऱ्या वरील खडे टोचतात व त्यांना त्रास होतो. यावर त्यांना वाटलं की आपण आपण या पायऱ्या झाडून साफ करूया. आणि जय ज्योती गटाच्या मुलांनी लगेच तो विचार अमलात आणला. या मुलांनी लगेच सगळ्या पायऱ्या झाडून साफ केल्या. देवीच्या दर्शनाला येणाऱ्या बायांनी त्याचं कौतुक केलं.
औरंगाबाद गट
औरंगाबादच्या गटातील एका मुलाने वृत्तपत्रात अशी बातमी वाचली की ‘औरंगाबाद शहरात इथून पुढे प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणलेली असून आता विक्रेत्यांना प्लास्टिक पिशव्या वापरण्यास मनाई आहे.’


ही बातमी वाचून गटाने बैठक घेऊन चर्चा केली की यावर आपण काही करू शकतो का. चर्चेअंती गटाने असं ठरवलं की ‘आपण कागदी पिशव्या बनवून सातारा परिसरातील काही औषध विक्रेत्यांना तसेच काही भाजी विक्रेत्यांना द्यायच्या.’
संक्रांतीच्या निमित्ताने गटाने जवळपास १५० कागदी पिशव्या बनवल्या आणि ठरल्याप्रमाणे परिसरातील औषध व भाजी विक्रेत्यांना दिल्या. आणि सोबतच या विक्रेत्यांना प्लास्टिक वापराचे तोटे समजावून सांगितले.
आम्ही जेव्हा गटाला भेट दिली तेव्हा गटाने आम्हाला वरील उपक्रम सांगितला आणि हे सगळं सांगताना मुलांना खूप आनंद होत होता. या भेटीत गटाने आम्हालाही त्यांनी बनवलेल्या सुंदर कागदी पिशव्या संक्रांतीनिमित्त भेट म्हणून दिल्या.


जाणीव गट चौसाळा
कुमार निर्माण टीम च्या चौसाळा भेटीदरम्यान मुलांशी बऱ्याच प्रश्नांवर चर्चा झाली होती. त्यापैकी एक म्हणजे शाळेच्या मैदानावर पसरलेली खडी. मुलांना खेळतानी ही खडी पायाला टोचायची. चालतानी चप्पल नसली तर खडीमुळे त्रास व्हायचा. चर्चेत मुलांनी ठरवले की आपण ही खडी उचलून एका जागी टाकू जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही.


मग काय एके दिवशी जाणीव गटाची मुले कामाला लागली. त्याचं बघून तिसरीतील मुलेही मग त्यांना मदत करायला आली. सगळ्यांनी मिळून खडी एकत्र केली आणि परत खडी कोणी पसरवून देवू नये म्हणून त्यावर काटेही टाकले.

पहिले जाणीव गटाच्या मुलांनी तिसरीतील मुलांना खवा-भट्टी बघायला नेऊन त्यांना मदत केली होती तर आता तिसरीतील मुलांनी जाणीव गटाच्या मुलांना त्यांच्या कामात मदत केली यामुळे त्यांची आता छान गट्टी जमलीय. 

मुलांच्या लेखणीतून


(चौसाळा येथील जाणीव गटाच्या मुलांनी कुमार निर्माण टीम साठी लिहलेलं पत्र)




कुमार निर्माण टीम जेव्हा जाणीव गटाला भेटायला म्हणून चौसाळ्याला गेली होती, तेव्हा प्रफुल्ल त्या शाळेतील तिसरीच्या वर्गात गेला होता. तेव्हा त्याने त्या मुलांना राजा आणि सोन्या या दोन बैलांची गोष्ट सांगितली होती आणि एक कोडं विचारलं होतं. या कोड्याच उत्तर नंतर लिहून पाठवा असही सांगितलं होतं. याचं तिसरीच्या मुलांनी नंतर जाणीव गटाला त्यांच्या कामात मदत केली. याचा अनुभव आणि कोड्याच उत्तर या मुलांनी आम्हाला लिहून पाठवलं. त्याचा फोटो प्रसिद्ध करत आहोत.