Thursday 31 August 2017

मुलांच्या लेखणीतून

भरारी गट, जळगाव
23 जुलैला गटाची पहिली सभा भरडीला शाळेच्या प्रांगणात घेण्यात आली; यात प्रथम लोकशाही फद्धतीने गट प्रमुख यांची निवड करण्यात आली. नंतर शिक्षकांच्या हातात पेपर होता त्यातल्या डोकलाम मुद्द्यावरून भारत आणि चीन यांच्यात युद्धजन्य परिस्थिती अशी बातमी होती. मुलांनी याच बातमीचा धागा धरून आपण चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला तर असा चर्चेचा विषय समोर आला. सरांनी सांगितले चिनी वस्तूवर बहिष्कार टाकल्याने काय होईल ?
आमच्यात चर्चा सुरू झाली. ‘चिनी वस्तू आपण विकत घेतो

त्यामुळे त्या देशातील उद्योगांना पैसा मिळून त्यांची भरभराट होते. त्यांना आपल्याकडून वस्तूच्या मोबदल्यात पैसा मिळतो आणि त्या पैशाचा उपोयग करून ते आपल्या देशासोबत भांडण करतात जर आपण त्या वस्तू घेतल्या नाहीतर त्यांच्याकडे जास्तीचे पैसे येणार नाहीत आणि त्याची आपल्या सोबत भांडण करणे कमी होईल आणि सर्व भारतीयांनी चीनी वस्तू वस्तू घेणे बंद केले तर ते आपल्या वाट्याला येणार नाही.’ मग सरांनी सांगितले अशा कोणत्या चिनी वस्तूवर बहिष्कार टाकणार? आणि गरज भागविण्यासाठी त्याऐवजी कोणत्या वस्तू वापरणार? असा सरांनी आम्हाला प्रश्न केला. याची पुढील मिटींग पर्यंत यादी करायचे ठरले. सोबतच आम्ही एक घोषवाक्य बनवले; ‘सुनो मेरे भाई, सून मेरी बहना, कभी न लेना मेड इन चाइना!’
मयूर जंजाळ, ७वी

मोहर गट, लांजा

आम्ही जेव्हा पोस्ट ऑफिसला भेट द्यायला गेलो तेव्हा रस्त्याच्या कडेला कचरा साठला आणि पडला होता. पोस्ट ऑफिसला भेट देऊन आल्यानंतर आम्ही ‘कचरा’ या विषयावर चर्चा केली. सरांनी विचारलं, “कचऱ्यात नेमक्या कोणकोणत्या वस्तू येतात?”, मुले म्हणाली, “खाऊचे कागद, पिशव्या, बाटल्या.”
सरांनी आम्हाला कचऱ्याविषयीचा विडीयो दाखवला. त्यामध्ये पशु-प्राण्यांनी कचरा म्हणजेच पिशव्या खाल्ल्या होत्या आणि ते २ ते ३ दिवसांत मरण पावले. तसेच पक्ष्यांनीही पिशव्या खाल्ल्या. तेदेखील मृत्युमुखी पाडले.
या प्रकारच्या कचऱ्याच्या वापरामुळे कोणकोणते फायदे व नुकसान होते यावर आता आम्ही चर्चा करत आहोत.
निमंत्रक: सुहास शिगम
आम्हाला सापडलेल्या चिमणीची गोष्ट – शिवाजी नगर गट, नागपूर
काल आम्ही सगळे खेळत असतांना वैष्णवीला एक चिमणीच पिल्लू दिसलं. त्याला पंख फुटलेले नव्हते आणि डोळे पण उघडायचे होते. तो छोटंसं पिल्लू होतं म्हणून आम्ही त्याला घरी आणलं. भूमीने एक पानाचा घोसला बनवला होत. त्या घोसल्यामध्ये आम्ही पान  टाकलं आणि आम्ही त्या पिल्लाला घोसल्यामध्ये ठेवलं. मग त्या पिल्लाच्या आईने तिच्या तोंडात चारा टाकतांना आम्ही लपून पाहत होतो. मग आम्ही पाणी पाजलं. एक मुलगा मात्र त्याला घेऊन गेला. आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला ते परत मागितलं आणि पुन्हा घरी आणलं. मग त्याला आम्ही तुळशीच्या झाडावर ठेवलं. आम्ही कामात होतो म्हणून एका मुलीजवळ दिलं. नंतर आम्ही त्याला आमच्या घराच्या बाजूच्या गल्लीत ठेवलं. तेव्हा तिथं चिमण्या आल्या त्या छोट्याश्या पिल्लासमोर ते पिल्लू आलं. तेव्हा चिमणी त्यांच्या जवळ जात होती. तेव्हा त्या चिमण्या पळून जायच्या. मग आम्ही त्या पिल्लाला तिथून उचललं. आम्ही नवीन घोसला बनवला. त्या घोसल्याला तुळशी पाशी ठेवलं. त्या पिल्लाची मम्मी तिथे होती. मग आम्ही त्या पिल्लाच्या मम्मीला हाकलल. त्या पिल्लाची मम्मी येत नव्हती. मग काल आभाळ आलं आणि मग जोरात पाऊस आला. मग त्या पिल्लाला जिथे पाऊस येत नव्हता. तिथं ठेवलं मग दुसऱ्या दिवशी त्या पिल्लाला दिसलं नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी पासून त्या पिल्लाला दिसत होत. मग ते चिमणीच्यासोबत या झाडावरून त्या झाडावर उडत होतं आणि अश्या प्रकारे आम्ही त्या पिल्लाचा जीव वाचवला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सर आल्यावर आम्ही सरांना ती चिमणी दाखवली व चिमणीची गोष्ट सांगितली म्हणून ती गोष्ट सरांनी आम्हाला लिहायला सांगतली व आम्ही ती लिहिली. आम्हाला जीव वाचावल्याचा खुप आनंद झाला.
निमंत्रक: नितीन कायरकर
 विशेष
उबंटू गट, पुणे


उबंटू गटाला निमंत्रकाने चर्चायुक्त अभ्यास दिला होता. ‘तुमच्यासाठी आता नवीन वर्ग तयार होत आहेत, त्यात तुम्हाला भिंतींवर काय हवे ते लिहून द्या.’ त्यावर गटातील मुलांनी वेगवेगळी मते दिली. बहुतांश मुलांनी आम्हाला वर्गात देवी- देवतांचे फोटो हवेत, म्हणजे परीक्षेच्यावेळी आशिर्वाद घेता येतील. सोबतच थोर व्यक्तींचे फोटो लावा असेही काहींचे मत आले. मग गटात खुली चर्चा व तोंडी मतेही मागितली गेली. तेव्हा एक मुलगा म्हटला की शिवाजी महाराजांचा फोटो लावा, लगेच दुसरा म्हटला आंबेडकरांचा लावा, तिसरा अजून काहीतरी म्हटला... आणि असे चालूच राहिले. मग गटातील वाद टाळण्यासाठी कृती ठरली की, काय लावायचे व का लावायचे याचे कारण लिहिणे. ज्याचे योग्य वाटेल ते ठरवू. त्यातील काही निवडक प्रतिसाद इथे देत आहोत.




No comments:

Post a Comment